आॅनलाईन
ऑनलाइन सोशल मीडियाद्वारे तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि गुलामी यात फरक असा आहे की गुलामांना माहिती असतं कि ते स्वतंत्र नाहीत. या तंत्रज्ञानामुळे अर्थात त्याच्या अयोग्य वापरामुळे येणाऱ्या पारतंत्र्याचा विचार केल्यास तरुण पिढी यात अधिक गुंतल्याची दिसते .खरे पाहिल्यास सर्वच वयोगटावर सोशल मीडियाच्या अति आणि अनावश्यक वापराचा परिणाम दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र लहान मुले व तरुणांवरचा हा परिणाम त्यांच्या आयुष्याचा प्रश्न बनतो. त्यामुळे अधिक धोकादायक आहे. जडणघडणीच्या, वाढीच्या वयातच सर्वांगीण विकास खुंटतो, त्यामुळे विशेषतः कुमारवयीन व तरुणांमधील मोबाईलफोन, टीव्ही, कम्प्युटरचा अति व अयोग्य वापर चिंतेचा विषय ठरतो. बरेचदा अनेक माणसे एका ठिकाणी बसलेली दिसतात. ती मुकी नसतात ,लाजरीबुजरी नसतात ,अनोळखीही नसतात तरीही त्यांच्या तोंडून चकार शब्द बाहेर पडत नाही. कारण ती सगळी दिवा लागलेल्या आयताकृती यंत्राकडे टक लावून बसलेली असतात. किती सामान्यपणे हे दृश्य दिसायला लागले आहे हल्ली! यालाच "स्क्रीन अडिक्शन" अर्थात दृश्य माध्यमांच्या आहारी जाणे म्हटले जाते. यामुळ...